देश

कॉंग्रेस करणार बांगलादेश मुक्ती संग्रामाची ५० वर्षे साजरी; ए. के. अँटनींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

सचिन शिंदे

कऱ्हाड : भारत विरूद्ध पाकिस्तान युद्धात १९७१ साली निर्माण झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या स्मरणार्थ काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर उपक्रम घेतले जाणार आहेत. त्या उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर समिती गठीत केली आहे. माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते ए. के. अँटनी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यासमितीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश पक्षाने केले आहे. 

भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामधील युद्धात भारताने पाकिस्तानला हरवून भारताने निर्माण केलेल्या बांगलादेशला ५० वर्षे पूर्ण होत त्या घटनेच्या स्मरणार्थ देशभर उपक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून समिती गठीत करण्यात आली आहे.

ED कारवाईत सुसाट, मात्र गुन्हे सिद्ध करण्यात नापास; पाहा रिपोर्टकार्ड

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या (स्व.) इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पाकिस्तानवर विजय मिळवीत पाकिस्तानचे दोन तुकडे करीत बांगलादेशची सन १९७१ साली निर्मिती केली होती. याच घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारत विरूद्ध पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला हरवून बांगलादेशची निर्मिती करण्यात आली हा दिवस १६ डिसेंबर ला विजय दिवस म्हणून दरवर्षी देशात साजरा केला जातो. म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ देशभर काँग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांची रचना व अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन केली आहे त्याची घोषणा काँग्रेस पक्षाने केली आहे.

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर

माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते ए. के. अँटनी या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, माजी संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह, श्रीमती किरण चौधरी, उत्तम कुमार रेड्डी, मेजर वेद प्रकाश, श्रीमती शर्मिष्ठा मुखर्जी, कॅप्टन प्रवीण डवर यांच्यासह माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT