Congress leader Salman Khurshid speaks about Rahul Gandhi  
देश

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते पळून गेले : सलमान खुर्शीद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावरच थेट निशाणा साधलाय. लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख नेतेच सोडून गेल्याने आता मोठे संकट आले असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले.   

महाराष्ट्र व हरियाना विधानसभा निवडणूका तोंडावर असतानाच काँग्रेसचे कोणतेही मोठे नेतृत्व प्रचारासाठी नाही. लोकसभेत मोठा पराभव पत्कारावा लागल्याने राहुल गांधींनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पक्षाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, असे खुर्शीद यांनी एका मुलाखतीत म्हणले आहे. पक्षात आव्हानात्मक स्थिती असून महाराष्ट्र व हरियानात विजयाची शक्यता अत्यंत कमी आहे, तर पक्ष आपले भविष्यही नीटसे ठरवू शकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले. पण ऑक्टोबरमध्ये दोन्ही राज्यांच्या निवडणूका झाल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाबद्दल विचार केला जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला याचेही विश्लेषण आम्ही करणार आहोत. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूका या काँग्रेससाठी आव्हानात्मक असणार आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा सुरू होणार; कधीपासून अन् तिकीट दर काय असणार? जाणून घ्या...

Nashik News: रुग्णालयातूनच रणनिती आखली, आजारी असूनही राजकारणावर पकड केली; उमेदवाराला जिंकवून भुजबळांनी ताकद दाखवली!

SCROLL FOR NEXT