Red Fort  esakal
देश

Video : 'मुघलांनी भारताला आकार दिला, मला त्यांचा अभिमान', काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

मुगलांनी छोट्या छोट्या राज्यांची निर्मिती करून भारताला हिंदुस्तानचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे मला मुघलांचा अभिमान आहे, असे वादग्रस्त विधान आसाममधील बारपेटा मतदारसंघाचे लोकसभा खासदार अब्दुल खालिक यांनी केले आहे. तथापि, मी मुघल नाही किंवा मी त्याचा वंशज नाही. त्यांनी हिंदुस्थानला एक आकार दिला आहे. मुघलांशिवाय देशाचा स्वातंत्र्यलढा अपूर्ण राहिला असता असेही खालिफ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

...तर लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे योग्य नाही

भारतात लाल किल्ला, ताजमहाल यांसारखी स्मारके बांधली त्यामुळे मुघलांचे देशासाठीचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. देशाचा प्रत्येक पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतो यावरून मुघलांचे महत्त्व लक्षात येते. मुघलांचा एवढा द्वेष असेल तर, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे योग्य होणार नाही, असेही खालिफ यांनी म्हटले आहे.

सीएम हिमंता बिस्वा यांना मुघलांची अॅलर्जी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्यावर निशाणा साधत खालिक म्हणाले की, आमच्या मुख्यमंत्र्यांना मुघलांची अॅलर्जी आहे. मात्र, मुघल काळापासून दिल्ली ही भारताची राजधानी होती, असा दावाही त्यांनी केला. हे उघडपणे व्यक्त करणे विचित्र वाटत असले तरी हे वास्तव आहे असेही खालिफ यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT