congress
congress 
देश

शंभर नेत्यांच्या पत्राचा  दावा काँग्रेसने फेटाळला 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काँग्रेसच्या १०० नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून पक्ष नेतृत्वाल बदल करण्याची मागणी केल्याचा दावा काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून निलंबित केलेले नेते संजय झा यांनी सोमवारी ट्टिटरवरून केला. मात्र पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तो फेटाळून लावला. 

सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अशी कोणतेही पत्र सोनिया गांधी यांना लिहिलेले नाही. फेसबुकच्या प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने रचलेला हा डाव आहे. सुरजेवाला यांनी भाजपवर हल्ला करताना लिहिले आहे की, भाजपचा डाव असलेले ही खोटी माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर ही माहिती पसरविण्याची सूचना ‘स्पेशल मिसइन्फरर्मेशन ग्रुप ऑन मीडिया-टीव्ही डिबेट गायडन्स’ ने दिली होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी संजय झा यांनी ट्विट करून लिहिले होते की, काँग्रेसचे सुमारे १०० नेते (खासदरांसह) राज्यांतील स्थितीवरून व्यथित आहेत. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा यांना पत्र लिहिले आहे. त्यात राजकीय नेतृत्वात बदल आणि काँग्रेस कार्यकारी समितीत पारदर्शी निवडणुकीची मागणी केली असल्याचा दावा झा यांनी केला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT