देश

दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर पुढं काय? केंद्र सरकार म्हणतंय...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेला पूर्ण होत आहे. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढणार का, याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. पण आता याबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. लॉकडाऊन संदर्भात 4 मेपासून नवी नियमावली लागू केली जाणार आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करून दिली.

लॉकडाऊन संदर्भातील आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लॉकडाऊनविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. या सुधारलेल्या परिस्थितीवर कोणाताही परिणाम होऊ नये, यासाठी येत्या 4 मेपासून नवी नियमावली जारी केली जाणार आहेत. याशिवाय जिल्ह्यांमधील परिस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी सशर्त सूट दिली जाईल. तसेच येत्या दिवसात याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे ट्विट करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्थलांतरित कामगार जाणार आपापल्या गावी

लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित कामगार, विद्यार्थ्यी आणि पर्यटकांच्या दृष्टीने केंद्राने मोठा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या या सर्वांना आता आपापल्या घरी जाता येणार असून, याबाबत गृहमंत्रालयाने यापूर्वीच आदेश जारी केला आहे. 

राज्यांशी संपर्कातून होणार निर्णय

एखाद्या गटाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधून रस्त्याने वाहतूक करण्यावर परवानगी दिली जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे असून, अडकलेल्या लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणे गरजेचे आहे, असेही या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

स्क्रिनिंग करावं

जी व्यक्ती प्रवासात जाणार आहे, त्या व्यक्तिचे स्क्रिनिंग केले जावे. तसेच ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं नाहीत, अशा लोकांनाच प्रवासाची परवानगी दिली जावी, असेही नमूद करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishan Kishan : बहुत खुश हूं! वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर इशानची पहिली रिअ‍ॅक्शन; आगरकरनेही निवडीमागचं कारण सांगितलं

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

ASHA MOVIE REVIEW: विषय, कथा, मांडणी सुंदर पण प्रेक्षकांना भावेल का? कसा आहे रिंकू राजगुरूचा 'आशा' चित्रपट?

Latest Marathi News Live Update : धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत

SCROLL FOR NEXT