Constitution Day : भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो. यामागे काही महत्वाची माहिती आजही लोकांना माहित नाही. भारताचं संविधान जगभरातल्या सर्व संविधानांचा अभ्यास करून मग बनवण्यात आलं आहे. म्हणून आपलं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे. विशेष म्हणजे हे फार कमी लोकांना माहित आहे की, संविधानाची मूळ प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या हाताने लिहिली आहे.
रायजादा यांनी टायपरायटरच्या मदतीनं नव्हे तर स्वतःच्या हाताने २५१ पानांचं हे संविधान लिहिलं आहे. वेळ घेऊन लिहिलेलं हे संविधान सुलेखनाचा उत्तम नमूना आहे. संपूर्ण संविधानात एकसारखं हस्ताक्षर बघायला मिळतं. रायजादा यांचे आजोबा रामप्रसाद इंग्रजी आणि फारसी विषयाचे प्रसिध्द विद्वान होते. त्यांनी आपल्या आजोबांकडून सुलेखन कला शिकली आहे.
रायजादा यांनी आपल्या आई-वडिलांच्या निधनानंतर चार भावंडांचं पालन पोषण केलं. जेंव्हा संविधान तयार झालं तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आपल्या हस्ताक्षरात इटॅलिक शैलीत लिहायला सांगितले. त्याचं मानधन किती रुपये घ्याल? असं विचारल्यावर रायजादा म्हणाले, देवानं दिलेलं माझ्याकडे सगळ काही आहे. फक्त एक इच्छा आहे की, संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव आणि त्याच्या शेवटच्या पानावर माझ्या वडिलांचं नाव लिहिता यावं. त्यांची ही इच्छा मान्य करण्यात आली.
संविधानाचे कागद पुण्याचे
संविधानन लिहिण्यासाठी वापरण्यात आलेले कागदं पुण्यातून मागवण्यात आले होते. संविधान लिहिण्यासाठी ३०३ निब होल्डर लेखणी, २५४ शाईच्या बाटल्या वापरण्यात आल्या. संविधानाच्या या लिखित दस्तावेजाच्या पानांना शांती निकेतनच्या नंदलाल बोस यांच्या अगुवाई वाली टीमने कालाकारी करून सजवलं. भारतीय इतिहासाच्या विविध अनुभवांना आणि आकड्यांना संविधानाच्या या पानांवर मांडण्यात आलं आहे.
अशा प्रकारे महान देशाच्या महान संविधानाला लिखित स्वरूपात ६ महिन्यांत तयार करण्यात आलं. नंतर संविधान सभेतल्या सर्व २९९ सदस्यांनी जानेवारी १९५० ला त्यावर स्वाक्षरी केली. त्यावेळी संविधानात एकुण ३९५ आर्टिकल, ८ शेड्युल आणि एक प्रस्तावना होती. संविधानाच्या पांडुलिपीत २५१ पानं आहेत. ज्याचं वजन पऊणे चार किलो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.