NCERT Syllabus  sakal
देश

NCERT Syllabus : सकारात्मक विचारांची पिढी घडवायची आहे;गुजरात दंगल, बाबरी मशिदीचा उल्लेख वगळल्याबाबत सकलानींचे प्रतिपादन

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमातून गुजरात दंगल आणि बाबरी मशीद पाडल्याच्या प्रसंगांचे उल्लेख काढून टाकण्यात आल्यामुळे वादंग निर्माण झाला असून, शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केले जात असल्याचा आरोप अनेकांकडून होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमातून गुजरात दंगल आणि बाबरी मशीद पाडल्याच्या प्रसंगांचे उल्लेख काढून टाकण्यात आल्यामुळे वादंग निर्माण झाला असून, शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केले जात असल्याचा आरोप अनेकांकडून होत आहे. दरम्यान ‘एनसीईआरटी’कडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. प्रतिवर्षी शैक्षणिक अभ्यासक्रमांचा फेरआढावा घेऊन अभ्यासक्रमात बदल करण्यात येतो त्यानुसार हा बदल करण्यात आला असल्याची माहिती, ‘एनसीईआरटी’चे संचालक दिनेशप्रसाद सकलानी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.

‘‘दंगलींबद्दलचे धडे शाळेतील विद्यार्थ्यांना का शिकवावेत? आम्हाला हिंसक आणि तणावग्रस्त नव्हे तर, सकारात्मक विचारांचे नागरिक घडवायचे आहेत. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशी शिकवण देणे अपेक्षित आहे का, ज्यामुळे ते हिंसक होतील किंवा दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण होईल द्वेषभावना निर्माण होईल. हाच शिक्षणाचा हेतू आहे का? आम्ही मुलांना दंगलींबद्दल शिवकवावे का? ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना याबाबत माहिती मिळेलच पण शाळेत याचे शिक्षण कशासाठी? असा सवाल सकलानी यांनी केला. अभ्यासक्रमात केलेल्या बदलाबद्दल होत असलेली ओरड ही अनावश्‍यक आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

यावरून होत आहे टीका

यंदाच्या ‘एनसीईआरटी’च्या सुधारित अभ्यासक्रमात इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र पुस्तकातील अयोध्या प्रकरणातील बाबरी मशिदीचे नाव वगळण्यात आले असून त्याचा उल्लेख तीन घुमट असलेली वास्तू असा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यातील मागील अभ्यासक्रमाच्या तुलनेत यंदाच्या पाठ्यपुस्तकातील या प्रकरणातून दोन-तीन पाने वगळण्यात आली आहेत. बाबरी मशीद पाडल्याच्या किंवा त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या उल्लेखांपेक्षा सुधारित अभ्यासक्रमामध्ये राममंदिराच्या निर्मितीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भाजपने सोमनाथ ते अयोध्या अशी काढलेली रथ यात्रा, कारसेवकांचे उल्लेख यांसह तत्कालीन भाजपशासित राज्यांत लागू करण्यात आलेले राष्ट्रपती शासन यांसह काही उल्लेख काढून टाकण्यात आले आहेत.

सकलानी म्हणाले....

  • १८८४मध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख काढल्यानंतरही अशाच पद्धतीने वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न

  • जे संदर्भ आता जुने झाले असून संबंधित घटनेबाबत ज्या नवीन घडामोडी घडल्या आहेत त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, यात अभ्यासक्रमाचे भगवेकरण करण्याचा कोणताही हेतू नाही

  • त्याचप्रमाणे सुधारित अभ्यासक्रमात देशातील वैभवशाली भारतीय संस्कृतीबद्दल माहिती देण्‍यात आली आहे, ही माहिती देणे म्हणजे भगवेकरण होते का?

  • आम्हाला विद्यार्थ्यांना केवळ तथ्ये सांगायची आहेत, कोणतेही वादंग निर्माण करायचे नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT