corona  
देश

Corona Updates: चाचण्यांच्या संख्येत तब्बल 4 लाखांनी घट; रुग्णवाढही कमी

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: रविवारी देशात कोरोनाच्या चाचण्यांत लक्षणीय घट झाल्याचे दिसले होते. शनिवारच्या तुलनेत रविवारी चाचण्यांची संख्या जवळपास 4 लाखांनी कमी झाल्याचे दिसले आहे. रविवारी देशात कोरोनाच्या 8 लाख 76 हजार 173 चाचण्या पार पडल्या. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 14 कोटी 3 लाख 79 हजार 976 चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे. 

 देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे प्रतिदिन रुग्ण 40 ते 50 हजारांच्या दरम्यान वाढत होते. पण आता चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णवाढीचा आकडाही कमी झाला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 38 हजार 772 रुग्णांचं निदान झालं असून 443 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत बाधित झालेल्यांचा आकडा 94 लाख 31 हजार 692 वर गेला असून एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 37 हजार 139 झाला आहे.

जगात सर्वात कमी मृत्यूदर-
दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा भारतातील मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे. देशात 10 लाख लोकांमागे फक्त 99 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्या जगातील इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात घट होत गेल्याचं दिसलं आहे. तसेच प्रतिदिन मृत्यूंचा आकडाही 500 च्या खाली गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

रिकव्हरी रेट वाढला-
सध्या कोरोनाचे 4 लाख 46 हजार 952 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर चांगली गोष्ट म्हणजे भारतातील रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत भारतात बाधितांपैकी 88 लाख 47 हजार 600 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत 45 हजार 333 जणांना डिस्चार्ज दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT