harshvardhan. 
देश

कोरोनाची लशीचा एकच डोस पुसेसा नाही; भारतीयांबाबत आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारतात सध्या चाचणी सुरू असलेलया लशी दोन-तीन डोसमध्ये दिल्या जातील, ही महत्वपुर्ण माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसीचा डोस दोनदा दिला जाईल. तर झायडस कॅडीलाने तयार केलेल्या लसीचा डोस तीन वेळेस दिला जाणार आहे. भारतात तयार होत असलेल्या बाकीच्या लसी सध्या क्लिनिकल टप्प्यात असून त्यांच्या डोसच्या काही चाचण्या करणे बाकी असल्याची माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

'संवाद'च्या चौथ्या आवृत्तीत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, जुलै 2021 पर्यंत भारत या लशींचे 400 ते 500 कोटी डोस तयार करेल.' आपल्याकडे एकापेक्षा अधिक लशी असणार असून त्या सर्व सुरक्षितही असतील. तसेच कोरोना व्हायरसविरुद्ध आवश्यक प्रतिकारशक्ती मिळण्यास या लसींचा फायदा होईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लसीचा सिंगल डोस आणि डबल डोस बाबत आपली मते मांडताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशातील कोरोना लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी लसीचा एकच डोस घेणे योग्य असणार आहे.

लसींच्या वितरणाच्या नियोजनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तयार केलेली लस संपुर्ण भारतभर प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचवणे महत्वाचे असणार आहे आणि त्याची काळजी घेणेही गरजेचे असणार आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

चाकूने गळा चिरून महिलेची हत्या; अहिल्यानगर जिल्हा हादरला, नवऱ्याचे शेजारच्यांना फाेन, दरवाजा उघडला अन् धक्काच बसला..

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

SCROLL FOR NEXT