बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात वादळ-वाऱ्यामुळे सध्याचा फायबरचा पुतळा कोसळून अनुचित घटना घडू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पुतळा सुरक्षित स्थळी कायमस्वरूपी बसविण्याच्या मागणीसाठी गावातील सुमारे 300 ते 350 महिला-पुरुष ग्रामस्थ गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.