Narendra Modi 
देश

लॉकडाऊनला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत : मोदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनचा निर्णय नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. राज्य सरकारने नियमांचे पालन करावे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यु लावण्यात आला होता. आजपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन असताना नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. काल थाळीनाद, शंखनादावेळी अनेक नागरिक एकत्र जमल्याचेही दिसले होते. यावरून मोदींनी आज ट्विट करत सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रातील मृतांची संख्या 3 वर गेली आहे.

मोदी म्हणाले, की लॉकडाऊनला अजूनही काही जण गांभीर्याने घेत नाहीत. कृपा करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवा. सरकारने घातलेल्या नियमांचे पालन करा. राज्य सरकारांना माझे सांगणे आहे, की त्यांनी नियम आणि कायद्याचे पालन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT