india corona janata curfew 
देश

जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण; कोरोनाचा कहर सुरूच

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाला थोपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २२ मार्चला जनता कर्फ्युचे आवाहन केले होते, या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. जगभरात कोरोना विषाणूचे नाव सर्वतोमुखी होण्यास सुरुवात होऊन त्याचा प्रभावही वाढत असल्याचे वृत्तांमधून समजत असल्याने, भारतात पंतप्रधानांच्या या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.भारतात कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढत असताना आणि अनेक शहरांमध्ये पुन्हा जनता कर्फ्यु, संचारबंदी लागू होत असताना पहिल्या जनता कर्फ्युवेळी होता तसा उत्साह आता काहीसा मावळल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने लगेचच २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जारी करत भारताने कोरोनाविरोधात युद्ध पुकारले होते. वेळेवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे भारतात कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता आले, असे अनेक अहवालांमधून सांगण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी ११ मार्चला कोरोना ही जागतिक साथ असल्याचे जाहीर केले. भारतात ३० जानेवारीलाच केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर गेल्या वर्षभरात भारतात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी १६ लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली असून दीड लाखांहून अधिक जणांचा या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने, आतापर्यंत कोरोना चाचण्या आणि आरोग्य सेवकांच्या, कोरोना योद्ध्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नियंत्रणा आलेली ही साथ पुन्हा जोर धरू नये आणि पुन्हा देशभरात जनता कर्फ्यु लावण्याची वेळ येऊ नये, यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारे वारंवार करत आहेत. 

देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला तेव्हा 66 रुग्ण होते. त्यानंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण 16 सप्टेंबर 2020 रोजी सापडले होते. दिवसभरात 97 हजार 894 इतका उच्चांक रुग्णसंख्येनं गाठला होता. जनता कर्फ्यूला वर्ष होत असताना 21 मार्चला देशात दिवसभरात नवीन 43 हजार 846 रुग्ण सापडले आहेत.

रविवारी भारतात कोरोनाचे 47 हजार रुग्ण सापडले असून गेल्या 130 दिवसांमध्ये एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 213 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 जानेवारीनंतर पहिल्यांदा हा आकडा 200 च्या वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात जवळपास 1 लाख 65 हजार इतके रुग्ण आढळले आहेत. त्या तुलनेत देशात 2 लाख 60 हजार नवीन रुग्ण सापडले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT