PM Modi  sakal
देश

देश विखारी चक्रात अडकला होता पण...; काँग्रेसवर टीका करत मोदींचं विधान

गेल्या आठ वर्षात भारताने जी उंची गाठलीये, त्याची कल्पनाही कोणी केलं नसेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. लहान मुलांसाठी पीएम केअर फंडांतर्गत योजनाचं लोकार्पण करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. २०१४ पूर्वी देश घोटाळे आणि घराणेशाहीच्या गर्तेत अडकला होता, अशी टीकाही त्यांनी केलं. (PM Narendra Modi on Congress)

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आज जेव्हा आमचं सरकार आठ वर्षे पूर्ण करत आहे, या देशाचा आत्मविश्वास, देशवासियांचा आत्मविश्वास अभूतपूर्व आहे. २०१४ पूर्वी हजारोंचे घोटाळे, भ्रष्टाचार, घराणेशाही, देशभरात पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव या सगळ्यामुळे देश एका विखारी चक्रात अडकला होता".

मोदी पुढे म्हणाले, "गेल्या आठ वर्षांमध्ये देशाने जी उंची गाठलीये, त्याची कल्पना यापूर्वी कोणी केली नसेल. आज भारताची मान जगभरात उंचावलेली आहे. आपल्या भारताची शक्ती जागतिक व्यासपीठांवर वाढलेली आहे. आणि मला आनंद आहे की हा भारताचा प्रवास युवकांच्या नेतृत्वाखाली होत आहे".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT