keral-air-india.jpg
keral-air-india.jpg 
देश

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांचा आला कोविड-19 रिपोर्ट

सकाळन्यूजनेटवर्क

तिरुवनंतपुरम- शुक्रवारी केरळमधील कोझिकोडे विमानतळावर एअर इंडिया विमानाचा अपघात झाला. यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत व्यक्तींची कोरोना चाचणी केली असता दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती केरळचे मंत्री केटी जलील यांनी दिली आहे. विमान अपघातात मृत झालेल्यांपैकी एकाचा कोविड-19 अहवाल आला असल्याचं मंत्र्याने सांगितलं आहे. 

विमान अपघातात मृत्यू झालेल्या 18 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील सुधीर वरयाथ (वय 45) या प्रवाशासह अन्य एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे विमान अपघानंतर मदतकार्यात गुंतलेल्या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असं राज्याचे आरोग्य मंत्री केके शैलेजा म्हणाले आहेत. 

भारत ब्राझील, अमेरिकेलाही मागे टाकतोय; देशात, 5 राज्यांमध्ये कोरोनाचा कहर

अपघातानंतर अनेक राजकीय नेते घटनास्थळी आले आहेत. केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंह पुरी, केरळचे राज्यपाल अरीफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि त्यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री शनिवारी करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिगवेळी गीअर खराब झाल्याने अनुभवी वैमानिकाला पहिल्यांदा लँडिंग करताना अडचण आली. त्यानंतर वैमानिकाने इंधन कमी केल्यानंतर 15 मिनिटांनी पुन्हा लॅडिंगचा प्रयत्न केला. मात्र, जोराच्या पावसामुळे विमान धावपट्टीवरुन घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.  वैमानिकाने पहिल्या प्रयत्नात लँडिंगचा निर्णय घेतला असता तर अपघात यापेक्षा मोठा झाला असता असं सांगण्यात येत आहे. 

विमान अपघात रात्री 7 वाजून 41 मिनिटांनी घडला. त्यानंतर कोझिकोडे विमानतळ बंद करण्यात आले आहे. नियोजित विमाने 80 किलोमीटर दूर असणाऱ्या कन्नूर विमानतळाकडे वळवण्यात आले आहे. 

२०२१ जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मूभा या कंपनीने दिली

केरळच्या कोझिकोड विमानतळाची धावपट्टी टेबलटॉप आहे. भारतातील सर्वात सुंदर अशा धावपट्ट्यांपैकी एक असलेली ही धावपट्टी लँडिंगसाठी धोकादायक मानली जाते. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्स्प्रेस एएसबी1344, बोइंग 737 हे विमान दुबईतून कालिकत इथं येत होतं. यावेळी विमानात 191 प्रवासी होते. विमान दुर्घटनेचं कारण धावपट्टी टेबलटॉप असल्याचंही सांगितलं जात आहे. धावपट्टीच्या आजुबाजुला डोंगर आणि दऱ्या आहेत. टेबलटॉप धावपट्टीमध्ये धावपट्टी संपल्यानंतर पुढे जागा शिल्लक नसते. त्यामुळे अशा धावपट्टीवर विमान घसरलं तर ते थेट दरीत कोसळण्याची शक्यता असते. कोझिकोड इथंही असंच झालं आणि विमानाचा मोठा अपघात झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT