देश

जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय

पीटीआय

कोची : आठवडा बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी टाकण्याच्या सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगत या निर्णयाविरोधात दाखल झालेली याचिका केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. नवीन निर्णयामुळे सरसकट पशूंच्या हत्येवर बंदी आलेली नाही. निर्णयाचे सखोल वाचन न करताच या निर्णयाचा विरोध होत असल्याचे मतही न्यायालयाने मांडले.

आठवडा बाजारात गोवंश विक्रीवर निर्बंध टाकणारा अध्यादेश केंद्र सरकारने जारी केला होता. पशुबाजारात पशूंची विक्री केवळ नांगरणी व दुग्ध व्यवसाय यांसारख्या शेतीशी संबंधित कामांसाठीच करता येईल असे आदेशात म्हटले होते. त्यानुसार म्हशी, गायी आणि उंट यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाविरोधात केरळमधील उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. यूथ कॉंग्रेसचे पदाधिकारी सुनील यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आज सुनावणी झाली.

मुख्य न्यायाधीश नवनिती प्रसाद यांनी ही याचिका फेटाळून लावली. कत्तलखान्यात नेण्यासाठी गायींची घाऊक प्रमाणात खरेदी-विक्री करण्यावर केंद्र सरकारच्या नव्या आदेशाने बंदी घालण्यात आली आहे. या आदेशामध्ये गोमांस विकण्यावर किंवा सेवनावर कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही. कोणीही शांतपणे हा आदेश वाचला तर त्याच्या हे लगेच लक्षात येईल, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदविले. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

Latest Marathi News Live Update : जीआरनंतर मराठवाड्यात कुणबीचे केवळ २७ प्रमाणपत्र- तायवाडे

Solapur: ७६ वर्षांनंतर सीनानदी धोक्याच्या पातळीवर; १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर, पातळी ४३०.६ मीटरवर

'तिला थंडी ताप आला त्याचं वेळी जर...' आईच्या आठवणीत तेजस्विनीला भावूक होऊन म्हणाली...'आयुष्याचा काही नेम नाही..'

SCROLL FOR NEXT