Curfew relaxed from 9am to 4pm in Guwahati, 
देश

गुवाहाटीत संचारबंदी शिथील; दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा  

वृत्तसंस्था

गुवाहाटी : नागरिकत्व कायद्यावरून आसामसह ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला असून, आज (शनिवार) आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये काहीकाळासाठी संचारबंदी उठविण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तूंसाठी नागरिकांच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

या विधेयकाला विरोधाचे याचे लोण आता पश्‍चिम बंगालमध्ये पोचले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणांवर हिंसक आंदोलने झाली. शुक्रवारी आसाममधील दिब्रुगड आणि मेघालयातील शिलॉंगमध्ये आज काही काळासाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती. आसाममधील उल्फा या बंडखोरांच्या संघटनेतील चर्चेचे समर्थन करणाऱ्या गटाचे नेते अरविंद राजखोवा यांनी या विधेयकामुळे आसाम नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. 

दरम्यान, संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यामध्ये रूपांतर झाले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर नागालॅंडमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी वस्तूंचा साठा करण्यास सुरवात केली आहे. आज नागालॅंडची राजधानी कोहिमासह दिमापूर येथील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तशीच परिस्थिती ईशान्येकडील अन्य राज्यांमध्येही पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT