Effect OF Cyclone Remal Esakal
देश

Cyclone Remal: भयंकर 'रेमल' चक्रीवादळ आज धडकणार; 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, 'या' राज्यांना बसणार फटका

Effect OF Cyclone Remal: बंगालच्या समुद्रकिनाऱ्यांवर चक्रीवादळ रेमलमुळे ताशी 135 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि समुद्रात 1.5 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

आशुतोष मसगौंडे

बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. रविवारी रात्री उशिरा हे वादळ किनारपट्टीवर धडकू शकते. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

या 9 तासांमध्ये या विमानतळावरून कोणतीही विमान वाहतूक होणार नाही. कोलकाता विमानतळाकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यात असे म्हटले आहे की, कोलकातासह पश्चिम बंगालच्या किनारी भागावर चक्रीवादळ रेमलचा प्रभाव पाहता २६ मे रोजी दुपारी १२ ते 27 मे सकाळी ९ वाजेपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. (Effect OF Cyclone Remal)

'या' राज्यांना बसणार फटका

बंगालच्या समुद्रकिनाऱ्यांवर चक्रीवादळ रेमलमुळे ताशी 135 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि समुद्रात 1.5 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

याव्यतिरिक्त, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्णतेचा प्रभाव दिसून येईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या भागांमध्ये सात दिवसांपासून कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची आशा नाही. या काळात अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जाऊ शकते.

हवामान खात्याच्या कार्यालयाने २६-२७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याशिवाय 27-28 मे रोजी ईशान्य भारतातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.

हवामान खात्याने मच्छिमारांना 27 मेच्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे.

पश्चिम बंगालच्या दक्षिण आणि उत्तर 24 परगणासारख्या किनारी जिल्ह्यांमध्ये 26-27 मे साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे काही भागात अतिवृष्टीची अपेक्षा आहे.

याशिवाय, कोलकाता, हावडा, नादिया आणि पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये 26-27 मे साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

26 मे रोजी मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासह बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये 27 आणि 28 मे रोजी पाऊस अपेक्षित आहे.

बिहारमध्येही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्रिपुरा सरकारने पुढील ४८ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळाचा इशारा दिल्यानंतर सर्व आठ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT