Dabholkar Kalburgi And Pansare Spoke Up Thats Why They Got Murdered Says Gulzar
Dabholkar Kalburgi And Pansare Spoke Up Thats Why They Got Murdered Says Gulzar 
देश

...म्हणून दाभोळकरांची हत्या : गुलजार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांनी समाजातील वाईट रुढी, परंपरा यांविरोधात आवाज उठवला होता. ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले'', असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले. 

गुलजार यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यादरम्यान गुलजार यांना विचारवंतांच्या हत्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गुलजार म्हणाले, ''विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे या अशा विचारवंतांच्या हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दाभोळकरांची हत्या करणाऱ्यांना शोधण्यात अद्यापही यश आलेले नाही. तसेच एम. एम. कलबुर्गी हे विचारवंत आणि लेखक होते. धारवाड येथे 2015 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचेही मारकरी अद्याप सापडलेले नाहीत. याशिवाय कॉम्रेड पानसरे हे डाव्या विचारांचे समर्थक होते. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, या सर्वांच्या मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही''. समाजातील या घटनांमुळे गुलजार यांनी दु:ख व्यक्त केले. 

दरम्यान, दाभोळकर, पानसरे किंवा कलबुर्गी या सर्वांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. असे करताना ते बोलले म्हणून मारले गेले, असेही गुलजार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT