Supreme Court Sakal
देश

बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा- सुप्रीम कोर्ट

कार्तिक पुजारी

राज्य बोर्डांनी बारावीच्या अंतर्गत मूल्यांकन पद्धतीची योजना लवकरात लवकर तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच १२ वीचा निकाल ३१ जूलैपर्यंत जाहीर करावेत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिले आहेत.

नवी दिल्ली- राज्य बोर्डांनी बारावीच्या अंतर्गत मूल्यांकन पद्धतीची योजना लवकरात लवकर तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच १२ वीचा निकाल ३१ जूलैपर्यंत जाहीर करावेत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिले आहेत. अंतर्गत मूल्यांकन पद्धत १० दिवसांमध्ये निश्चित करायला हवी, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने या महिन्याच्या सुरुवातीला CBSE आणि CISCE बोर्डाला अंतर्गत मूल्यांकन पद्धत ठरवण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला होता. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Declare Class 12 Results By July 31 Supreme Court To State Boards)

सुप्रीम कोर्टाने CBSE आणि CISCE बोर्डाला अंतर्गत मूल्यांकन निकष ठरवण्यास सांगितले होते. आता अशाच प्रकारचे निर्देश कोर्टाने राज्य बोर्डांना दिले आहेत. CBSE आणि CISCE बोर्डाने याआधीच अंतर्गत मूल्यांकन निकष कोर्टासमोर सादर केले आहेत. सुप्रीम कोर्टाने या मूल्यांकन निकषाला हिरवा झेंडा दाखवला आहे. तसेच मूल्यांकन निकष 'योग्य आणि वाजवी' असल्याची टीप्पणी जोडली आहे.

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. काही पालक आणि विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. असे असले तरी काही पालकांनाकडून परीक्षा घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण, कोर्टाने त्या फेटाळून लावल्या आहेत.

लाखो विद्यार्थी आणि पालकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २१ राज्यांनी १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याला सर्वाधिक महत्त्व आहे आणि त्याबाबत कसलीही तडजोड चालणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT