delhi,metro service  
देश

अखेर 169 दिवसांनी मेट्रो धावली; दिल्लीकरांसाठी मोठा दिलासा!

सकाळ ऑनलाईन टीम

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाच महिन्यापासून बंद असलेली दिल्ली मेट्रो (Delhi Metro) पुन्हा एकदा धावण्यास सुरुवात झाली. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडून  मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहनही दिल्ली मेट्रो प्राधिकरणाकडून  (DMRC) करण्यात आले आहे. तीन टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या मेट्रो सेवेत  कंटेन्मेंट झोनमधील स्थानकांचा समावेश करण्यात आलेला नाही. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार टप्प्याटप्यातून मेट्रो सेवा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

बिहारमध्ये भाजपचा व्हर्चुअल प्रचार

त्यानंतर डीएमआरसीने 7 ते 12 सप्टेंबर दरम्यान तीन टप्प्यात सेवा बहाल करण्याची घोषणा केली होती. गुरुग्रामम येथील हूडा सिटी सेंटर ते दिल्‍लीतील समयपुर बादली या मार्गावर पहिली मेट्रो धावली.  पहिल्या टप्प्यात  सकाळी सात ते अकरा आणि दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत मेट्रो धावणार आहे. मेट्रो सेवा पूर्ववत होणे ही दिलासादायक गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो विशेष तपासणीनंतर स्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT