Delhi Crime News esakal
देश

Delhi : 500 रुपये परत न दिल्याने ब्लेडने गळा चिरुन खून

सकाळ डिजिटल टीम

राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आलीय.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं अवघ्या 500 रुपयांसाठी एका व्यक्तीची हत्या करण्यात आलीय. ही घटना समयपूर बादली भागातील (Samayapur Badli) आहे. आरोपींनी आधी त्या व्यक्तीच्या डोक्यात सिलेंडरला घातला आणि नंतर गळा चिरुन त्याचा खून केलाय. याप्रकरणी पोलिसांनी बॉबी आणि रामविलास या दोन मित्रांना अटक केलीय. कर्जात घेतलेले पाचशे रुपये परत न केल्यामुळे हा खुनी हल्ला करण्यात आलाय.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, राजबीर असं मृताचं नाव असून, तो कचरा वेचण्याचं काम करत होता. राजबीर हा समयपूर बादली भागातील जीटी कर्नाल रोड (GT Karnal Road) येथील झोपडपट्टीत राहत होता. बॉबी (23) आणि राम निवास (27, रा. अलिगड, उत्तर प्रदेश) यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी रात्री उशिरा आम्हाला खुनाची माहिती मिळाली आणि घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना झोपडपट्टीजवळ गळा चिरलेला आणि डोक्याला जखमा असलेला रक्तानं माखलेला मृतदेह आढळला.

राजबीरनं बॉबीकडून 400-500 रुपये उसने घेतले होते, ज्याची परतफेड तो करू शकला नाही. पोलिस चौकशीत आरोपींनी सांगितलं की, शुक्रवारी तिघांनी मिळून दारू प्यायली आणि पैसे मागितल्यावर राजबीरनं बॉबीला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरुन बॉबीनं राजवीरच्या डोक्यात सिलेंडर घातला आणि त्यानंतर राम निवासनं त्याचा ब्लेडनं गळा चिरला, अशी त्यांनी कबुली दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्कवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

Palghar Rain: पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जनजीवन विस्कळीत

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

SCROLL FOR NEXT