Bihar news  
देश

नोकरीसाठी आक्रमक तरुण थेट पोहोचला मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठाजवळ; CMच्या सुरक्षेत मोठी चूक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बिहारमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे मोठे प्रकरण समोर आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गांधी मैदानावर स्वातंत्र्यदिनी संबोधित करत होते, त्यादरम्यान एक युवक व्यासपीठाजवळ घुसला आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करत घोषणाबाजी करू लागला.

तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. यावेळी तरुणाने घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पटनाचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. चंद्रशेखर यांनी घटनेबाबत सांगितले की, तो मुंगेरचा रहिवासी आहे. नितीश कुमार असे या तरुणाचे नाव असून त्याच्या हातात पदक होते. राजेश्वर मंडल असे तरुणाच्या वडिलांचे नाव आहे.

युवकाच्या वडिलाचे 1996च्या निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असताना निधन झाले होते. ते बीएमपीचे शिपाई होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीबाब या तरुणाने मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने केली. या घटनेची माहिती बिहार पोलिस मुख्यालयाला देण्यात आली आहे. तसेच घटनेचा तपास करण्यात येत आहे. युवक व्हीआयपींच्या रांगेत कसा पोहोचला, याची देखील चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

SCROLL FOR NEXT