Arvind Kejriwal
Arvind Kejriwal 
देश

'धृतराष्ट्र' निवडणूक आयोगाला वाटते भाजपनेच जिंकावे- केजरीवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सवरून (ईव्हीएम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य करत, आयोग हे 'धृतराष्ट्र' असून त्यांना फक्त 'दुर्योधन' भाजप जिंकावे असेच वाटते.

ईव्हीएममध्ये गडबड गेल्याने पंजाब आणि गोवामध्ये पराभव झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी यापूर्वी केला होता. आता पुन्हा एकदा केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची थेट धृतराष्ट्राशी तुलना करत ते आपला मुलगा दुर्योधनाला वाचविण्यासाठी या मशीन्सचा वापर करत असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले, की निवडणूक आयोगाला त्यांचा मुलगा भाजप कोणत्या परिस्थितीत जिंकलेला हवा आहे. निवडणुका आयोगाचा निवडणुका घेण्यापेक्षा भाजपला विजय मिळवून देण्याचाच हेतू आहे. राजस्थानमधील धौलपूर पोटनिवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएमपैकी काही मशिन्समध्ये फेरफार करण्यात आले होते. दिल्लीत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राजस्थानमधूनच ईव्हीएम आणण्यात येणार आहेत. दिल्लीतील मशीन्स रद्द करून राजस्थानमधूनच का आणण्यात येत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT