Rape case news
Rape case news esakal
देश

Live In Relationship मधून बाहेर पडल्यावर महिलेचं एकटं राहणं अवघड - अलाहाबाद हायकोर्ट

सकाळ डिजिटल टीम

Allahabad High Court: लिव्ह इन रिलेशनशीपमधून बाहेर पडल्यानंतर एका महिलेचं एकटं राहणं अवघड असतं, असं निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. भारतीय समाज अशा प्रकारच्या संबंधांना सहजासहजी स्वीकारत नाही, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

आपल्या विवाहित लिव्ह इन पार्टनरचा बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमधून बाहेर पडल्यानंतर एका महिलेला एकटं राहणं अवघड असतं. कारण भारतीय समाज अजून अशा संबंधांना मोठ्या प्रमाणावर मान्यता देत नाही.

न्यायालयाने असंही म्हटलं आहे की, अशा प्रकरणांमध्ये महिलेकडे आपल्या पार्टनरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. आरोपी आदित्य राज वर्मा याच्या जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी करण्यात आली आहे. आदित्यला २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्याने आपल्या लिव्ह इन पार्टनरला लग्नाचं वचन दिलं होतं, पण नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणात पीडित महिला विवाहित आहे. तिचं म्हणणं आहे की आदित्य तिच्यासोबत गेल्या दीड वर्षांपासून राहत आहे आणि त्याच्यापासून ती गरोदरही आहे. मात्र आता आदित्यने आपल्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT