Jayant Narlikar birthday esakal
देश

Jayant Narlikar : हुशारी अन् स्वभाव जुळून आला अन् जयंत नारळीकर पडले डॉ. मंगला यांच्या प्रेमात...

नारळीकर यांनी विज्ञानातील अनेक बदल, नवे शोध जगापुढे मांडले. त्यांच्या अनेक मुलाखतींतून त्यांनी विज्ञानाची व्याख्या जगापुढे मांडली.

साक्षी राऊत

Jayant Narlikar Love Story : कुशाग्र बुद्धी आणि विविध विषय हाताळण्याचा तगडा अनुभव असणारे जयंत नारळीकर. विज्ञानाच्या विश्वात त्यांना मानाचं स्थान आणि त्यांची प्रचितीही दूरवर. जयंत नारळीकरांचा आज वाढदिवस. नारळीकर यांनी विज्ञानातील अनेक बदल, नवे शोध जगापुढे मांडले. त्यांच्या अनेक मुलाखतींतून त्यांनी विज्ञानाची व्याख्या जगापुढे मांडली.

जयंत नारळीकर हे खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ आहेत. त्यांच्या या विषयांवर सखोल अभ्यास आहे. त्यांची पत्नी मंगला नारळीकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यासुद्धा गणितज्ज्ञ होत्या. मंगला आणि जयंत नारळीकर यांची प्रेम कहाणी सुरु झाली ती त्यांच्या स्वभावामुळे. दोघेही गणितज्ज्ञ आणि कुशाग्र बुद्धीचे. त्यांचे स्वभावगुण जुळून आलेत आणि मग काय थोड्याच दिवसांत मनंही जुळलीत.

टोमॅटो एफएमला दिलेल्या एका मुलाखतीत जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीवर दिलखुलास गप्पा केल्या होत्या. त्यातलाच हो छोटासा किस्सा. जयंत आणि मंगला यांची पहिली भेट त्यांच्या कुटुंबियांनीच जुळवून आणली होती. त्यामागचा कुटुंबियांचा हेतूसुद्धा दोघांना ठाऊक होता. त्यांची ओळख झाल्यानंतर एकामेकांसोबत गप्पा आणि फिरणं झाल्यानंतर जयंत आणि मंगला एकमेकांसाठी अनुरूप आहेत असं त्यांना वाटलं. त्यानंतर जयंत नारळीकर यांनी मंगला यांना पत्र लिहीलं. त्यात लिहीले होते की, "मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल.तुला मी पसंत आहे का?"

नारळीकरांच्या या पत्राला मंगला यांचासुद्धा होकार होता. नारळीकर यांस परिचय विवाह असं म्हणत. जयंत नारळीकरांना मंगला यांच्या कुशाग्र बुद्धीचा अंदाज होताच पण लग्नाला होकार दिल्यानंतरच्या भेटीत मात्र त्यांना काय बोलावं काही सुचेना. त्या गप्प होत्या. त्यांना असं वाटायचं की जयंत एवढे हुशार शास्त्रत्र शिवाय केंब्रिंजमध्ये राहतात यांच्या नेमकं काय बोलावं. मात्र गप्प मंगला यांना नारळीकरांनी बोलतं केलं. त्यांनी मंगला यांना केंब्रिजमधले काही मजेदार किस्से सांगितले आणि हसवलं. त्यांचा हा सहृदयपणा मंगला यांना चांगलाच रूचला. शिवाय कुटुंबियांचीही लग्नाला परवानगी होती.

६ फेब्रुवारीला जयंत आणि मंगला यांचा साखरपुडा झाला. त्यावेळी जयंत हे भारतात वेगवेगळ्या विषयावर लेक्चर्स घ्यायला आले होते. आता लग्न करूनच वधूला तिकडे घेऊन जातील असे घरच्यांना वाटले. मात्र त्याला चार महिन्यांचा काळ लोटला. त्यामागे कारण असं होतं की, जयंत नारळीकर केंब्रिजमध्ये बॅचलर राहायचे. त्यामुळे लग्नानंतर कुठे राहायचं याची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे ते म्हणाले मी आता परत जातो तिथे सगळी व्यवस्था करतो आणि मग परत आल्यानंतर लग्न करून हिलाही घेऊन जाईल. (Birthday Special)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT