देश

कृषी कायद्यांमुळे ४० टक्के बेरोजगार होतील;काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा पंतप्रधानांवर पुन्हा घणाघात

सकाळन्यूजनेटवर्क

जयपूर - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांवरून आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.या तीन कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मित्रांसाठी रस्ता मोकळा केला आहे,याचा फटका देशातील कृषी व्यवसायाशी संबंधित चाळीस टक्के लोकांना बसेल, असा आरोप त्यांनी केला. 

राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यामध्ये पिलीबंगा शहरात आयोजित किसान महापंचायतीमध्ये ते बोलत होते. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनंतर या कृषी कायद्यांच्या माध्यमातून देशातील जनतेला मोठा धक्का देण्यात आला आहे. शेती, व्यापार, आणि कामगार या क्षेत्रांतील चाळीस टक्के लोकांना या कायद्यांचा थेट फटका बसणार असल्याचेही राहुल यांनी नमूद केले. नोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसा हटविण्यासाठी घेण्यात आला नव्हता हे त्याचवेळी मी सांगितले होते पण लोकांना ते समजू शकले नाही. यानंतर जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली हा लघू- मध्यम उद्योजकांवर हल्ला होता. मोदींना त्यांच्या मित्रांसाठी मार्ग मोकळा करायचा आहे, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. 

राहुल म्हणाले 
मोदींनी आपला भूभाग चीनला दिला 
मोदींना शेतकऱ्यांची ताकद माहिती नाही 
संसदेमध्ये कृषी कायद्यांचे वास्तव मांडले 
कृषी उद्योगास एक व्यक्ती चालवू शकत नाही 
कृषी कायद्यांमुळे मंडी व्यवस्था संपेल 
एकच व्यक्ती अमर्याद धान्य खरेदी करेल 
काँग्रेसने अमूल आणून लोकांना रोजगार दिला 
पूर्वसूचना न देताच देशभर लॉकडाउन केले 
 
पायलट चौथ्या रांगेत 
राहुल यांच्या आजच्या महापंचायतीमध्ये व्यासपीठावर सोफे आणि खुर्च्यांऐवजी खाटा मांडण्यात आल्या होत्या. राहुल यांनी ३२ मिनिटांच्या भाषणामध्ये बारावेळा मोदींचे नाव घेतले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे राहुल यांच्या शेजारी बसले होते तर सचिन पायलट यांना चौथ्या रांगेत स्थान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालला दोन मोठे महामार्ग प्रकल्प; पायाभूत सुविधांवर सरकारची मोठी गुंतवणूक

SCROLL FOR NEXT