देश

अयोध्यावासीयांना हवे शिक्षण आणि सुरळीत जीवन

पीटीआय

अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिकतेवर आधारित असला तरी स्थानिक नागरिकांना या वादापेक्षा शिक्षण आणि सुरळीत दैनंदिन जीवनाबाबत अधिक काळजी आहे. 

आजच्या दिवशी अनेक संघटना विविध कार्यक्रम आयोजित करतात. अयोध्यावासी या कार्यक्रमांकडे "सालाबादप्रमाणे' या दृष्टिकोनातूनच पाहतात. ज्या शहरात राममंदिर बांधण्यासाठी "संपूर्ण देश' उत्सुक आहे, त्या शहरातील युवकांना आणि इतर नागरिकांना या राजकारणात न पडता शिक्षण घेणे आवश्‍यक वाटत आहे. "आजचा दिवस काही जणांसाठी शौर्याचा आहे, तर काहींसाठी दुःखाचा आहे. येथील विद्यार्थी मात्र आता समंजस झाले असून, त्यांच्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व आहे. ही मुले अयोध्येतील वाद आणि त्याचे परिणाम पाहतच मोठी झाली आहेत,' असे येथील प्राध्यापक नीलय तिवारी यांनी सांगितले. "सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राजकीय संघटनांमध्ये सहभागी होण्यापासून कोणालाही रोखले नसले, तरी अभ्यास करण्यातच भले आहे, हे बहुतांशी विद्यार्थ्यांना समजले आहे,' असे राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाचे कुलगुरू मनोज दीक्षित यांनी सांगितले.

अयोध्येतील वादाबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईलच, त्या वेळी याबाबतचे राजकारणही संपुष्टात येईल. अयोध्येतील सामान्य माणूस दैनंदिन गरज भागविण्यासाठी धडपडत असून, राजकीय घडामोडींकडे आता तो आकर्षित होत नाही, असे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT