Rahul Gandhi and Rajiv Kumar 
देश

Election Commission : आम्ही कोणाच्याही सांगण्यावरून काम करत नाही; निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आसाममधील जिल्ह्यांच्या पुनर्व्याख्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नावर निवडणूक आयोगाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसने एका महत्त्वाच्या बैठकीत आसाम परिसीमन प्रक्रिया ही पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला होता. तसेच याबाबतीत निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला होता.

निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, निवडणूक आयोग कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेत नाही. एक आयोग म्हणून आमची प्रक्रिया दोन तत्वांवर अवलंबून असते. ती म्हणजे, प्रकटीकरण आणि सहभाग.

आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन बोरा यांनी सांगितले होते की, मी दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले होते. निवेदनात जिल्ह्य़ाच्या सीमांच्या पुनर्व्याख्याबाबत त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. 'आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला आणि चर्चा करायला तयार आहोत, पण आधी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

काँग्रेसचे आमदार आणि आसाममधील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी सोमवारी सांगितले की, ते आता फक्त 10-15 मिनिटे देत आहेत. एवढ्या कमी वेळेसाठी त्यांना भेटून काही फायदा होईल असे आम्हाला वाटत नाही.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांशी सल्लामसलत करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच आम्ही इतर कोणत्याही पक्षापूर्वी काँग्रेस पक्षालाच जानेवारीत बैठकीसाठी वेळ दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

Shirur Kasar Loan Waiver: चार हजार ५२१ शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग झाला मोकळा; शिरूर कासार; कर्जमुक्तीची पहिल्या टप्प्याची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Marathi News Live Updates : डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी RSS वर बंदी घालून दाखवावी; भाजप प्रदेशाध्यक्षांचं ऑपन चॅलेंज

August 2026 Horoscope: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् उत्पन्नाचे नवे मार्ग; ऑगस्टमध्ये ‘या’ ४ राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT