देश

तीन वर्षांत नक्षलवाद संपवू : राजनाथसिंह

पीटीआय

लखनौ : भारतातून पुढील तीन वर्षांमध्ये नक्षलवाद संपुष्टात आणला जाईल, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज व्यक्त केला. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) शीघ्र कृती दलाच्या 26 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

येथे जवानांशी संवाद साधताना राजनाथसिंह म्हणाले, ""नक्षलवाद्यांचा तीव्र धोका असलेल्या जिल्ह्यांची संख्या 126 वरून आता 10 ते 12 वर आली आहे. देशातून पुढील तीन वर्षांमध्ये नक्षलवाद संपुष्टात येईल, याबाबत मला विश्‍वास वाटतो. हे सर्व तुमचा दृढनिश्‍चय, धैर्य आणि कष्टामुळे शक्‍य झाले आहे. तुम्हा जवानांच्या या कामाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.'' गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी 131 नक्षलवाद्यांना आणि दहशतवाद्यांना ठार मारले आहे. 1278 जणांना अटक झाली असून, 58 जणांनी शरणागती पत्करली आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. 

"अविचारी कृती टाळा' 

भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार घडवत असले, तरी "सीआरपीएफ' आणि स्थानिक पोलिस दलामुळे सुरक्षेची स्थिती चांगली असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. दंगल आणि निदर्शनांवेळी शीघ्र कृती दलाच्या जवानांनी तत्काळ आणि वेगाने कारवाई करताना अविचारी कृती होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी जवानांना दिला. कोणत्याही सुरक्षा दलावर क्रूरपणाचा शिक्का बसता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी दिली. 

काश्‍मीरमधील निवडणुकीसाठी सज्ज 

जम्मू-काश्‍मीरमधील हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असून, येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुरक्षा दले पूर्णपणे सज्ज आहेत, असे राजनाथसिंह यांनी पत्रकारांना सांगितले. या निवडणुका उद्यापासून (ता. 8) सुरू होत असून, चार टप्प्यांत पूर्ण होणार आहेत. काश्‍मीरमधील घुसखोरीला आणि दहशतवादाला पाकिस्तानकडून अद्यापही पाठबळ मिळत असले, तरी त्यांचा सामना करण्यास सुरक्षा दले समर्थ असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT