Lok Sabha Election  esakal
देश

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला रामराम! काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी आणि माजी आमदार प्रेमलता यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे

रोहित कणसे

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम केला असून ते मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वीरेंद्र सिंह यांचे पुत्र बृजेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बृजेंद्र हे हरियाणामधील हिस्सार मतदारसंघाचे खासदार आहेत.

वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी आणि माजी आमदार प्रेमलता यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये येण्याआधी वीरेंद्र सिंह हे काँग्रेसमध्ये होते. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये ते भाजपमध्ये आले होते. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवत पोलाद मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. भाजप आणि जननायक जनता पक्ष यांच्या युतीला वीरेंद्र सिंह यांनी विरोध केला होता. युतीची शक्यता लक्षात घेऊन बृजेंद्र यांनी भाजपला रामराम केला होता. मात्र भाजप आणि जननायक जनता पक्ष यांनी वेगवेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. भाजप आणि जननायक जनता पक्ष यांच्याबद्दल युती होणार नसल्याचे स्पष्ट होऊनही वीरेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT