grain 
देश

यंदा विक्रमी धान्योत्पादनाची आशा 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - २०१९-२० च्या हंगामासाठी धान्योत्पादनाचा दुसरा सुधारीत अंदाज कृषी खात्याने आज जाहीर केला. मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यंदा विक्रमी धान्योत्पादन अपेक्षित असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या अंदाजानुसार अन्नधान्याचे उत्पादन २९.१९५ कोटी टन होईल. तर गहू आणि तांदळाचेही विक्रमी उत्पादन असेल. 

कृषी खात्याने राज्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारे सुधारीत अंदाजाची आकडेवारी आज जाहीर केली. यानुसार 29.195 कोटी टन धान्योत्पादन होईल. मागील वर्षीच्या धान्योत्पादनाच्या तुलनेत ही वाढ 67.4 लाख टनांची असली तरी 2013-14 ते 2017-18 या पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत तब्बल 2.62 कोटी टनांची वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तांदूळ उत्पादन 11.74 कोटी टन आणि गव्हाचे उत्पादन 10.621 कोटी टन असेल. तांदळाचे उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा 96.7 लाख टनांनी तर गव्हाचे उत्पादन पंचवार्षिक सरासरीच्या 1.16 कोटी टनांनी वाढीव असल्याचा सरकारने दावा केला आहे. दुसऱ्या सुधारीत अंदाजानुसार यंदा भरड धान्याचे उत्पादन 4.524 कोटी टन आणि ज्वारीचे उत्पादन 2.808 कोटी टन होईल. यासोबतच कडधान्ये आणि तेलबियांचे देखील वाढीव उत्पादन अपेक्षित आहे. यामध्ये तूर उत्पादन 36.9 लाख टन होईल. तर हरभरा उत्पादन 1.122 कोटी टनांवर जाईल. तेलबियांचे एकत्रित उत्पादन 3.419 कोटी टन अपेक्षित आहे. त्यात सोयाबिन 1.363 कोटी टन, मोहरी 91.1 लाख टन, भुईमूग 82.4 लाख टन यांचा समावेश आहे. याखेरीज कपाशीच्या 3.489 कोटी गासड्यांचेही (प्रति गासडी 170 ग्राम) उत्पादन होऊ शकते. तर ऊस उत्पादन 35.385 कोटी टनांवर जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT