farmers protest 
देश

चर्चेची आजची पाचवी बैठक होणार 'आर या पार'; शेतकऱ्यांनी व्यक्त केला निर्धार

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांनी देशात रान उठवलं आहे. हे तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून या कायद्यांना जोरदार विरोध शेतकरी संघटनांकडून नोंदवला जातोय. पंजाब आणि हरियाणा भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर जमले असून दिल्लीच्या सीमेवर त्यांनी चक्का जाम केला आहे. ऐन थंडीतील या आंदोलनाचा आज दहावा दिवस असला तरीही शेतकऱ्यांचा निर्धार जराही ढासळला नाहीये. आज चर्चेची पाचवी बैठक आहे, या बैठकीत काही ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना अमान्य असणारे तीन कृषी कायदे सरकारे आवाजी मतदानाने पारित केले होते. या कायद्यांना विरोधी पक्षांचा तर विरोध आहेच सोबतच एनडीएतील घटक पक्षांनीही या मुद्यांवरुन एनडीएची साथ सोडली आहे. शेतकऱ्यांनी या कायद्याच्या विरोधात कंबर कसत मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीनेच दिल्लीकडे कूच केली आहे. चर्चेच्या चार फेऱ्या दिल्लीतील विज्ञान भवनात झाल्या आहेत. मात्र अद्याप एकाही बैठकीला यश आलं नाहीये. आज चर्चेची पाचवी बैठक होणार आहे.

आज आर-पारची लढाई करुन येऊ. रोज रोज बैठक होणार नाही. आजच्या बैठकीत अन्य कोणतीही चर्चा होणार नाही. कायदा रद्द करण्याबाबतच चर्चा होईल, असं किसान संयुक्त मोर्चाचे प्रमुख रामपाल सिंह यांनी म्हटलं आहे. सरकारने कृषीविषयक ते तीन काळे कायदे रद्द करण्याची घोषणा करावी. तसेच MSP चालू राहिल हे लिखित स्वरुपात द्यावे. जर आजच्या बैठकीत काहीच सकारात्मक घडलं नाही तर राजस्थानातील शेतकरी NH-8 हायवेवर तसेच जंतरमंतर मैदानात तीव्र आंदोलन करतील असा इशारा किसान महापंचायतचे अध्यक्ष रामपाल जट यांनी दिला आहे.

सरकार वारंवार तारीख देत आहे. सर्वच संघटनांना आता एकमताने हा निर्णय घेतलाय की आज चर्चेचा हा शेवटचा दिवस असेल. जर आजच्या बैठकीत काही ठोस असा निर्णय झाला नाही तर संसदेला घेराव घालू असा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे. 
आज सरकारच्या प्रतिनिधींसोबतची बैठक सकारात्मक ठरेल अशी आशा आहे. आमच्या मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत तोवर आम्ही मागे हटणार नाही. आम्ही याहून अधिक जोरदार आंदोलन करु, असं एका शेतकऱ्याने म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT