Delhi Farmers Protest Updates Esakal
देश

Delhi Farmers Protest Updates: आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तोडगा निघणार? आज शेतकरी अन् मोदी सरकार यांच्यात चर्चा

Delhi Farmers Protest Updates: पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा थांबवण्यात आला आहे. शेतकरी आज रेल रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा थांबवण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे हे निदर्शन आज आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी संघटनांनी पंजाबमध्ये रेल रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर आज शेतकरी नेते आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यातही चर्चा होणार आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याशिवाय शंभू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत. बुधवारी शेतकरी संघटनांनी पंजाबमध्ये आज रेल रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि हरियाणा पोलिसांवरही दगडफेक केली, याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. हरियाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, निदर्शनाच्या नावाखाली अशांतता पसरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे असेल तर त्यांनी बस, ट्रेन किंवा पायी जावे, आम्ही त्यांना ट्रॅक्टरने दिल्लीला जाऊ देणार नाही.

आज पंजाबमध्ये रेल रोको आंदोलन

पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियनने आज राज्यात रेल रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. बुधवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत संपूर्ण राज्यात गाड्या थांबवण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेने सांगितले होते. शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत, मात्र पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत आणि पाण्याचा मारा केला जात आहे, हे चुकीचे आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

शंभू सीमेवर दुसऱ्या दिवशीही तणाव कायम

(काल) बुधवारी निमलष्करी दलाच्या 60 कंपन्या आणि हरियाणा पोलिसांच्या 50 तुकड्या शंभू सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सीमेवर अनेक थरांचे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी सीमा ओलांडण्याचा किंवा बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराचे नळकांडे टाकण्यात आले. पहिल्या दिवसाप्रमाणेच ड्रोनमधून अश्रूधुराचे नळकांडे सोडण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस

पंजाबमधून ‘दिल्ली चलो’ मोर्चासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशीही हरियाणाच्या शंभू सीमेपलीकडे जाऊ दिलेले नाही. शंभू सीमेवर पंजाब सीमेवरून ट्रॅक्टर ट्रॉलींची लांबलचक रांग आहे, ज्यामध्ये शेतकरी सहा महिन्यांचा माल घेऊन दिल्लीत तळ ठोकू इच्छितात. निषेधाच्या दुसऱ्या दिवशी फतेहगढ साहिबपासून सुरू झालेले लोक सीमेवर पोहोचल्याने ट्रॉलींची संख्या वाढली. मात्र, हरियाणा पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT