farmer
farmer sakal
देश

कृषी कायद्यांविरुद्ध तमिळनाडूचाही शड्डू

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : पंजाब, राजस्थान आणि अन्य राज्यांचा कित्ता गिरवताना तमिळनाडू सरकारनेही चेन्नई येथील शेतकरी संमेलनात केंद्र सरकारने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. देशातील सर्वच राज्यांनी हे कायदे नाकारावे म्हणून संपूर्ण देशभर ‘किसान स्वराज यात्रा’ सुरू होणार आहे.

ज्या राज्यांनी केंद्राचे तिन्ही कृषी कायदे अद्याप नाकारलेले नाहीत अशा सर्वच राज्यांमध्ये किसान स्वराज यात्रा जाईल. जागतिक अहिंसा दिन (२ ऑक्टोबर २०२१) पासून संविधान दिन (२६ नोव्हेंबर २०२१) पर्यंत ही यात्रा चालेल. देशातील विविध राज्यांतून प्रवास केल्यानंतर ही यात्रा थेट दिल्लीला धडक देईल.

या यात्रेदरम्यान शेतकरी आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांच्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्यात येईल, त्याप्रमाणे युवा जोश, बेरोजगारी आणि जागतिक तापमानवाढीचे संकट याबाबत लोकांत जागृती करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT