Viral News
Viral News esakal
देश

पाचव्यांदा बोहल्यावर चढणार होता ७ मुलांचा बाप; मुलांनी रोखला विवाह, नववधू फरार

धनश्री ओतारी

उत्तरप्रदेश राज्यातील सीतापूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जगात अशी बरीच माणसं आहेत ती एक नव्हे तर अनेकवेळा विवाहबंधनात अडकताना दिसतात. मात्र, उत्तरप्रदेशमध्ये अजब प्रकार पाहायला मिळालं. मुलानेच ५ व्यांदा लग्न करणाऱ्या बापाचा विवाह मोडला. इतकेच नाही तर नवरदेवाच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नीच्या मुलांनी वडिलांना पाचव्यांदा लग्न करताना पाहून लग्नमंडपातच राडा केला. मुलांचा गोंधळ पाहून घाबरलेली नववधू लग्नमंडपातून पळून गेली. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

उत्तर प्रदेशमधील राज्यातील सीतापूर येथील कोतवाली परिसरात एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलाने आपल्या वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नेमका काय आहे प्रकरण?

त्यांच्या वडिलांनी आधीच पाच विवाह केले आहेत आणि त्यांना सात मुलेही आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, दुसरी त्यांची आई आणि त्यानंतर दोन विवाह गुपचूप उरकले आहेत. त्याचबरोबर आता पाचव्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी करत आहेत. तसेच, आता लग्न होत असलेल्या मुलीच्या घरच्या लोकांनी घर व अन्य संपत्ती आपल्या नावावर करण्याची अट घातली होती. त्या अटीवरच हे लग्न होणार होते. असे दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलाने म्हटले आहे.

त्यांचे वडील आधीपासूनच घरात पैसे देत नाहीत. त्याचबरोबर आईपासून वेगळे राहतात. मुलांनी याबाबत कोहना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलांचा राग पाहून वधू पळून गेली तर नवरदेवास पोलिसांनी अटक केली आहे.

पाचव्यांदा लग्न करणाऱ्या बापाचा मुलांनी पोलिसांना बोलावून विवाह रोखला. पोलिसांना पाचव्यांदा लग्न करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीचा पाचवा नाही तर तिसरा विवाह होता. मात्र मुलांनी पाचवा विवाह असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT