FIR filed against 50 celebrities who sends letter to PM Modi about Mob lynching  
देश

मोदींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 50 कलाकारांविरूद्ध तक्रार दाखल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी देशात सर्रास होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या विरोधात 50 कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. आता या 50 कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात मोठमोठ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. मॉब लिंचिंगप्रकरणी या कलाकारांनी मोदींना पत्र लिहिल्यानंतर मुझफ्फरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी याचिका दाखल केली होती.

याप्रकरणात अनुराग कश्यप, रामचंद्र गुहा, मणीरत्नम, अपर्णा सेन अशा अनेक बड्या कलाकारांचा समावेश आहे. ओझा यांनी याचिका दाखल केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी निकाल देत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 20 ऑगस्टला हा आदेश देण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले. या तक्रारीत 50 कलाकारांचा समावेश होता. 

कलाकारांनी मोदींना लिहिलेल्या या पत्रातून देशाची प्रतिमा अपमानास्पद करण्याचा व पंतप्रधान मोदींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करण्यात आला. यात सार्वजनिक शांततेचा भंग, धार्मिक भावनांना धक्का, देशद्रोह या कलमांचा समावेश आहे. जुलैमध्ये 50 कलाकारंनी मोदींना मॉब लिंचिंगविरोधात पत्र लिहिले होते. मॉब लिंचिंग थांबावे यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत अशा आशयाचे हे पत्र होते.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT