Operation Ajay 
देश

Operation Ajay: इस्राइलमधला अनुभव अवर्णनीय! युद्धभूमीतून परत आलेल्या भारतीयांनी मानले केंद्र सरकारचे आभार

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. त्यामुळे अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले होते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने 'ऑपरेशन अजय' लॉन्च केले असून त्याअंतर्गत पहिले विशेष विमान भारतीयांना घेऊन देशात उतरलं आहे. २१२ प्रवाशांना घेऊन हे विमान आज सकाळी नवी दिल्लीत आले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यावेळी विमानतळावर उपस्थित होते.

युद्धजन्य प्रदेशातून आलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. प्रवाशांनी भारत सरकारचे याबाबत आभार मानले आहेत. युद्ध सुरु असल्याने एअर इंडियाने आपली विमानसेवा थांबवली होती. त्यामुळे इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांचा नाइलाज झाला होता. अशात भारत सरकारने ऑपरेशन आखून तेथे अडकलेल्या भारतीयांना परत देशात आणण्यासाठी मोहीम आखली आहे.

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' अशा तत्त्वावर प्रवाशांना संधी दिली जात आहे. नोंदणी करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला परत मायभूमीत आणलं जाणार आहे. एनडीटीव्हीच्या माहितीनुसार विमान प्रवासाचा खर्च भारत सरकार उचलत आहे. पहिले विमान भारतात दाखल झाले असून आणखी भारतीयांना देशात परत आणले जाणार आहे.

भारतात परत आलेल्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शुभम कुमारने पीटीआयला प्रतिक्रिया दिली की, आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. अनेक माझे विद्यार्थी मित्र घाबरले होते. पण, याकाळात आमच्यासोबत भारतीय दूतावास होता. परतण्यासाठीची नोंदणी सुरु झाल्यानंतर आम्हाला मोठा दिलासा मिळाला. त्यांनी सर्वकाही सोय केली.

इस्राइलमध्ये १८ हजार भारतीय अडकल्याचे सांगितले जाते. तसेच भारतात परत येण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली आहे. या सर्वांना ऑपरेशन अजय अंतर्गत परत आणले जाणार आहे. एका विद्यार्थ्याने म्हटलं की, 'अशा प्रकारच्या परिस्थितीचा आम्ही पहिल्यांदाच सामना करत होतो. पण, आम्ही भारत सरकारचे खूप आभारी आहोत. विशेष करुन पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला परत आणले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.' (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT