देश

पंधरा वर्षात पहिल्यांदाच कर्नाटकातील 'हे' कुटुंब मंत्रिपदापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यात गोकाकमधील जारकीहोळी कुटुंबातील एकही सदस्य नाही. पंधरा वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी मंत्री होतील, अशी अपेक्षा होती. पहिल्या यादीत त्यांचे नावही होते. पण, शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झाला अन्‌ जारकीहोळी कुटुंबाला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले.

पंधरा वर्षांत जारकीहोळी कुटुंबातील सदस्य मंत्रिमंडळात नाही, असे कधीच झाले नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी जारकीहोळी कुटुंबातील एक मंत्री कायम होता. मात्र, विद्यमान भाजप सरकार त्याला अपवाद ठरले आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघेजण आमदार आहेत. गोकाक मतदारसंघातून रमेश जरकीहोळी (अपात्र), यमकनमर्डीतून सतीश जारकीहोळी (काँग्रेस) व अरभावीतून भालचंद्र जारकीहोळी (भाजप) निवडून आले आहेत.

सर्वच पक्षांच्या मंत्रिमंडळात जारकीहोळी कुटुंबातील एका सदस्याला सतत मंत्रिपद मिळाले आहे. भाजप - धजद आघाडी सरकार असताना भालचंद्र, काँग्रेस-धजद सरकारमध्ये सतीश तर सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात रमेश आणि सतीश यांना स्थान मिळाले होते. एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातही रमेश व सतीश यांनी आलटूनपालटून मंत्रिपद भोगले आहे.

जारकीहोळी कुटुंबाच्या ताब्यात अनेक साखर कारखाने आहेत. सर्व उद्योग क्षेत्रासह राजकारणातही कार्यरत आहे. जारकीहोळी कुटुंबाने अनेक दशकांपासून बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व ठेवले आहे. तरीसुद्धा यावेळी भाजपचे सरकार असूनही भालचंद्र यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. 

सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका
येडियुराप्पा सरकार सत्तेवर यावे, यासाठी रमेश जारकीहोळींनी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी केली. असंतुष्ट आमदारांना संघटीत केले. त्याला भालचंद्र जारकीहोळी यांनी साथ दिली. त्यातून युती सरकारचे पतन होऊन भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु, सध्यातरी मंत्रिमंडळात रमेश किंवा भालचंद्र जारकीहोळी यांपैकी कुणालाही संधी मिळालेली नाही. भविष्यकाळात त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजप सूत्रांचे मत आहे.

सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका
येडियुराप्पा सरकार सत्तेवर यावे, यासाठी रमेश जारकीहोळींनी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी केली. असंतुष्ट आमदारांना संघटीत केले. त्याला भालचंद्र जारकीहोळी यांनी साथ दिली. त्यातून युती सरकारचे पतन होऊन भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु, सध्यातरी मंत्रिमंडळात रमेश किंवा भालचंद्र जारकीहोळी यांपैकी कुणालाही संधी मिळालेली नाही. भविष्यकाळात त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजप सूत्रांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT