इंफाळ : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील भूस्खलन दुर्घटनेत आतपर्यंत चोवीस जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच १८ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यात १३ जवान आणि पाच नागरिकांचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
जिरीबाम येथे भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिस आणि एनडीआरएफचे पथक कालपासून घटनास्थळी वेगाने काम करत आहेत. पावसामुळे मदतकार्यात अडथळे आले. यावेळी हवाई दलाची देखील मदत घेण्यात आली.
या भूस्खलनात किती जण बेपत्ता झाले आहेत, याचा नेमका आकडा सांगणे कठीण आहे. जिरीबामला इंफाळशी जोडणाऱ्या एका रेल्वे मार्गाचे काम सुरू असून त्यासाठी तुपूल यार्ड येथे १०७ जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी रात्री तेथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आणि त्यात अनेक जण दबले गेले.
यामुळे गुरुवार सकाळपासूनच मदतकार्याला सुरवात झाली. काल आठ जणांचे मृतदेह सापडले होते आणि त्यानंतर आज सहा जणांचे मृतदेह हाती लागले. मातीच्या ढिगाऱ्याखालून १८ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत एकूण चौदा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.