गुलाब नबी आजाद यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्या नंतर कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हिमंत विश्व शर्मा "म्हणाले की जर तुम्ही गुलाम नबी आझाद यांचे पत्र आणि मी 2015 मध्ये लिहिलेले पत्र वाचले तर तुम्हाला काही प्रमाणात समानता आढळेल.
राहुल गांधी अनुभवी आहेत हे काँग्रेसमधील सर्वांनाच माहीत आहे. सोनिया गांधी यांच पक्षावर लक्ष नाही, त्या फक्त मुलाला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. "ते पुढे म्हणाले या कारणा मुळेच कॉंग्रेसचे निष्ठावंत लोक पक्ष सोडत आहेत. मी एकदा भविष्यवाणी केली होती एक वेळ आशी येईल की कॉंग्रेसमध्ये फक्त गांधी परिवारच राहील आणि आता हे खरं होताना दिसत आहे. पुढे म्हणाले खरंच राहुल गांधी भाजपसाठी वरदान आहेत.
गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
पक्षश्रेष्ठीने ज्या व्यक्तीचा आदर केला.आणि आता जर तोच पक्षावर आशा प्रकारे टीका, करत असेल तर त्यातून व्यक्तीचे खरे चारित्र्य समोर येते. काँग्रेस महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाविरुद्ध लढा देत असताना, हा राजीनामा दिला, हे अत्यंत दु:खद आहे.- काँग्रेस
गुलाम नबी आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ नेते विरोधकांच्या आणि जनतेच्या आवाजाला बळ देतील अशी आम्हाला अपेक्षा होती. - काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन
राज्यसभेचा कार्यकाळ संपताच आझाद अस्वस्थ झाले, क्षणभरही ते पदाशिवाय राहू शकले नाहीत - पवन खेरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.