Lok Sabha Election Esakal
देश

Lok Sabha Election: '...तर ४०० जागा आल्यास ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर उभारले जाईल', मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

Lok Sabha Election: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. यादरम्यान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भाजपने ४००चा आकडा पार केल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीतील लोकसभेच्या 7 जागांसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी भाजपने आपली सर्व ताकद दिल्लीत लावली आहे. भाजपचे बडे नेते दिल्लीत आहेत. इतकेच नाही तर विविध राज्यांचे मुख्यमंत्री रोड शो करून आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत आहेत. या दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. यावेळी त्यांनी भाजपने ४००चा आकडा पार केल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल असं आश्वासान दिलं आहे.

यादरम्यान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भाजपने ४००चा आकडा पार केल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल. ते म्हणाले की, मागील निवडणुकीत आम्ही राम मंदिर बनवायचे आहे असे सांगितले होते आणि यावेळी निवडणुकीत आम्ही तुमच्यामध्ये आलो तेव्हा राम मंदिर बांधले आहे. त्यामुळे आता विजयही मोठा झाला पाहिजे, कारण आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. भाजप जेव्हा 400 चा आकडा पार करेल तेव्हा मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल.

ते म्हणाले, "जेव्हा काँग्रेस भाजपला 400 पेक्षा जास्त जागा का हव्यात असे विचारत होती, तेव्हा मला असे वाटले की याचे उत्तर आपल्याकडे असावे. म्हणून मी म्हणालो की, आमच्याकडे 300 जागा होत्या तेव्हा आम्ही राम मंदिर बांधले. आता आम्ही मथुरेत कृष्णजन्मभूमीही बनवणार आहे आणि ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथाचे मंदिर बांधणार आहे.

आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा आम्हाला एक प्रकारे सांगितले होते की, काश्मीर भारतात तसेच पाकिस्तानमध्ये आहे. आमच्या संसदेत कधीही चर्चा झाली नाही की, जे काश्मीर पाकिस्तानकडे आहे ते खरे तर आमचे आहे. गेल्या 7 दिवसांपासून तेथील परिस्थिती समोर येत आहे, तिथे रोज निदर्शने होत आहेत आणि तिथले लोक भारतीय झेंडे घेऊन पाकिस्तानचा निषेध करत आहेत. ते पाहून मला वाटते की, ही तर सुरुवात आहे. मोदीजींना 400 जागा मिळाल्या तर पीओकेही भारताचा होईल. सुरुवात आधीच सुरू झाली आहे. त्यामुळे मला काँग्रेसला सांगायचे आहे की आम्हाला ४०० जागांची गरज का आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT