देश

सामाजिक संपर्क टाळा; सरकारचे नागरिकांना आवाहन 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संपर्क टाळणे हे अत्यंत आवश्‍यक असल्याचे सांगत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले असून त्याचाच भाग म्हणून जनतेला वारंवार आवाहन केले जात आहे. 

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिबंधात्मक उपायांवर सरकार भर देत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. एक दिवस पूर्ण सहकार्य केल्याने आपण संसर्गाची साखळी तोडू शकतो. त्यामुळे सामाजिक संपर्क टाळणे अत्यावश्‍यक आहे. या विषाणूशी सामना करताना नागरिकांना कोणत्याही जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व राज्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून केंद्र सरकारनेही राज्यांच्या कोरोनाविरोधातील मोहिमेला बळकटी आणण्यासाठी पथके रवाना केली आहेत, असे अगरवाल यांनी सांगितले. जयपूरमध्ये आज इटलीच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला. तो संसर्गमुक्त झाला होता. हा मृत्यू कोरोना विषाणूच्या बळींच्या संख्येत मोजणार नसल्याचेही अगरवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशात आज पन्नास नवे रुग्ण आढळले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT