नवी दिल्ली - चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील वाढत्या टेन्शनच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गलवान खोऱ्यात चीनकडून अजूनही आगळीक सुरु आहे.चीन आपलं सैन्य मागे घेण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर आता भारताने कठोर पावलं उचलायला सुरवात केलीये. सगळ्या बाजूने आता भारतातर्फे चीनची नाकाबंदी केली जातेय. यातील एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे भारतातर्फे आता ५९ चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे.
भारताने चीनच्या तब्बल ५९ मोबाईल ऍप्लिकेशनवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. भारताने बंदी घातलेल्या या ऍप्लिकेशन मधून भारतीयांच्या प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून या ऍप्लिकेशन्सवर भारताने बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये भारतात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या टिक टॉकचाही समावेश आहे. आज दिल्लीत माहिती आणि तंत्रज्ञान मिनिस्ट्रीची (Ministry of Information Technology) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कलम 69A अंतर्गत एकूण ५९ चिनी ऍप्लिकेशन्सवर भारतातर्फे बंदी घातलेली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत याबाबत प्रेस रिलीज जारी करण्यात आलंय
खालील चिनी ऍप्लिकेशनवर आता बंदी
Government of India has decided to ban 59 Chinese apps diverting data and those with privacy issues
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.