नवी दिल्ली - राज्यपाल अनिल बैजल यांच्या सुधारित आदेशानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करावे लागत असल्याने दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रुग्णवाहिकांचा तुटवडा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याने आरोग्य यंत्रणेला या रुग्णांना सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दिल्ली सरकारने वाढत्या कोरोनाच्या रुग्णांना घरीच एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य विभागाचे पथ संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन त्याची तपासणी करत होते. त्यानुसार सल्ला दिला जात होता. मात्र तरी देखील रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यपालांनी तो निर्णय रद्द करत अशा रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. त्याला राज्य सरकारकडून विरोध होत आहे. अशा रुग्णांना आता घरातून रुग्णालयात नेणे, तेथे त्यांची तपासणी करणे आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. काही प्रमाणात घरीच आयसोलेशनची व्यवस्था असेल तर त्याबाबतही विचार केला जात आहे. यामुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. दिल्लीत सध्या 465 रुग्णवाहिका असून, त्या या रुग्णांसाठी वापरल्या जात आहेत. मात्र रुग्णसंख्येचा विचार करता राज्यात एक हजार रुग्णवाहिकांची आवश्यकता असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत सध्या 13 हजार रुग्ण घरात एकांतवासात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.