Groundnut sacks stone and muds 
देश

भुईमूगाच्या पोत्यांमध्ये खडे आणि चिखल 

महेश शहा

अहमदाबाद : भुईमूग खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने गुजरातमधील विजय रुपानी सरकार अडचणीत आले आहे. सरकारने एका शेतकरी सहकारी संस्थेकडून खरेदी केलेल्या पोत्यांमध्ये भुईमुगाबरोबरच चिखल आणि खडे असल्याचे उघड झाले आहे. 

राजकोट जिल्ह्यातील जेटपूर येथील एका खासगी गोदामात खरेदी केलेल्या 'भुईमुगा'ची तीस हजार पोती सापडली आहेत. राज्याचे कृषिमंत्री आर. सी. फालदू यांनी या प्रकरणी मोठा गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले असून, दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. भुईमुगाच्या 35 किलोच्या प्रत्येक पोत्यामध्ये 22 किलो खडे आणि चिखल असल्याचे आढळून आले आहे. 

भाजपचा एक नेता आणि सहकारी संस्थेच्या स्थानिक अधिकाऱ्याने संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. गुजरात राज्य सहकारी कापूस फेडरेशन लि. (गुजकॉट) या संस्थेच्या अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा अंदाज आहे. 'नाफेड'ने 900 रुपये या किमान आधारभूत किमतीला भुईमूग खरेदी करण्याचे अधिकार 'गुजकॉट'ला दिले आहेत. सरकारी लिलावात भुईमूग खरेदी केल्यानंतर माल घेण्यास आलेल्या व्यापाऱ्यांना ही भेसळ दिसून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT