gvk group vice chairman sanjay reddy on mumbai airport deal with adani group amide rahul gandhi allegations  
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या मुंबई एअरपोर्टबाबतच्या आरोपांवर GVK कंपनीचा खुलासा; म्हणे, अदानी ग्रुपने…

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाला विकणाऱ्या GVK समूहाने राहुल गांधींनी संसदेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाला विकणाऱ्या GVK समूहाने राहुल गांधींनी संसदेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी म्हणाले होते की, हे विमानतळ अदानी समूहाला मिळावे यासाठी केंद्र सरकारने सीबीआय आणि ईडी या केंद्रीय संस्थांना GVK समूहावर दबाव आणण्यास भाग पाडले.

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना GVK समूहाचे उपाध्यक्ष संजय रेड्डी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच अदानी समूह किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून कोणताही दबाव नव्हता असे सांगितले आहे.

ते म्हणाले की या कराराच्या एक वर्ष आधीपासून आम्ही गुंतवणुकीच्या शोधात होतो. कारण बंगळुरू विमानतळाच्या अधिग्रहणाच्या वेळी आम्ही घेतलेले कर्ज आमच्यावर थकीत होते. ते कर्ज आम्हाला फेडायचे होते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदार शोधत होतो. मग आम्हाला तीन गुंतवणूकदार सापडले जे आमच्या कंपनीत एकत्र पैसे लावण्यास तयार होते.

मात्र, त्यांनी अनेक अटी आमच्यासमोर ठेवल्या होत्या. करार पुढे जाण्यापूर्वी कोरोना आला. या दरम्यान विमानतळाचा व्यवसाय तीन महिने ठप्प झाला आणि आम्हाला शून्य महसूल मिळाला. त्यामुळे आमच्यावर आणखी आर्थिक ताण आला. अशा परिस्थितीत आम्ही वरील तिन्ही गुंतवणूकदारांना हा करार लवकर पूर्ण करण्यास सांगितले, परंतु तसे होऊ शकले नाही, असे रेड्डी यांनी सांगितले.

याच सुमारास गौतम अदानी यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला मुंबई विमानतळासाठी इच्छुक असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. महिनाभरात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची त्यांची तयारी होती. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. रेड्डी म्हणाले, कंपनीसाठी हा करार आवश्यक असल्याने आम्ही हा करार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT