देश

देशाच्या निम्म्या भागात दुष्काळाची छाया

सकाळवृत्तसेवा

गांधीनगर : देशातील निम्म्या भागात दुष्काळ असून, त्यातील 16 टक्के भागात अपवादात्मक किंवा अत्यंत भीषण स्थिती असल्याचे मत "आयआयटी' गांधीनगरच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे. भारतातील दुष्काळाविषयीच्या योग्य अनुमान पद्धतीविषयी संशोधन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. 

सध्या पडलेल्या दुष्काळामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे आव्हान उभे राहणार आहे, असे "भारत तंत्रविज्ञान संस्थे'च्या (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी- आयआयटी) सहायक प्राध्यापक विमल मिश्रा यांनी सांगितले. दुष्काळासंबंधी सत्यशोधन संशोधकांच्या या पथकामध्ये पीएच.डी.चे विद्यार्थी अमरदीप तिवारी यांचा समावेश आहे. या समितीने भारतीय हवामान विभागाकडून हवामान (आयएमडी) व पर्जन्यमानाची माहिती गोळा केली होती. नंतर मातीतील ओलावा व दुष्काळ पडण्यास कारणीभूत असलेले घटक एकत्र आणून आभासी दुष्काळ निर्माण करण्यात आला. आयआयटी गांधीनगरमधील जल व हवामान प्रयोगशाळेने या अभ्यासातून काढलेले निष्कर्ष "आयएमडी'च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मिश्रा म्हणाले, "" देशातील 47 टक्के भाग दुष्काळाचा सामना करीत आहेत. 16 टक्के भागात अत्यंत भीषण स्थिती आहे, हे आम्ही आमच्या सत्यशोधन निरीक्षण पद्धतीनुसार दाखवून दिले आहे. ही पद्धत आम्ही देशासाठी विकसित केली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये यंदा चांगला पाऊस पडला नाही. झारखंडमधील काही भाग, आंध्र प्रदेशचा दक्षिणेकडील भाग, गुजरात आणि तमिळनाडूच्या उत्तर भागावर दुष्काळाची छाया आहे.''

न्सूनच्या आगमनापूर्वी या भागात अतितीव्र उन्हाळा असला, तर परिस्थिती अतिशय गंभीर बनेल, असा इशारा त्यांनी दिला. 
""सततच्या दुष्काळामुळे आधीच खालावलेल्या भूजलावर मोठा भार पडेल. भूजल पातळी वाढविण्यासाठी आपल्याकडून फारसे उपाय होत असल्याचे दिसत नाही. तर, दुसरीकडे दुष्काळामुळे पाण्याचा अधिकाधिक उपसा होत आहे. याचा देशावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्‍यता आहे. गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू शकते,'' अशी शक्‍यताही मिश्रा यांनी व्यक्त केली. 

अभ्यासातील निष्कर्ष

- जागतिक तापमानवाढीमुळे दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ 
- भूजलचा बेसुमार उपसा 
- भूजल पातळी वाढविली नाही, तर परिस्थिती गंभीर 
- कमी पाण्यावरील पिके घेणे गरजेचे 
- भरपूर पाणी लागणारी पिके टाळावीत 
- भूजल व जलसंवर्धनासाठी सरकारने कठोर निर्णय घेणे अपेक्षित 
- घरगुतीपेक्षा शेतीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर सर्वाधिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT