Bus Accident Esakal
देश

Haryana School Bus Accident: चालक नशेत धुंद, स्थानिकांनी अडवलं चावीही काढली पण...; 6 विद्यार्थांचा जीव घेणाऱ्या अपघातावेळी काय घडलं वाचा?

ईदची सुट्टी असतानाही ही शाळा कशी सुरु होती, याची चौकशी केली जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हरयाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात गुरुवारी एका शाळेच्या बसला भीषण अपघात झाला, यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर इतर २० जण जखमी झाले. या अपघातावेळी नेमकं काय घडलं? हे आता स्थानिकांच्या माहितीतून समोर आलं आहे.

स्कूलबसचा ड्रायव्हर हा दारुच्या नशेत धुंद होता, स्थानिकांनी त्याला अडवण्याचा, बसची चावीही काढण्याचा प्रयत्न केला पण शाळेच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. (Haryana school bus accident locals tried to stop drunk driver before bus crash snatched his key)

प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शाळेच्या आवारातून जेव्हा ही बस निघणार होती तेव्हा बसचा ड्रायव्हर धर्मेंदर हा दारुच्या नशेत होता. त्यामुळं स्थानिकांनी त्याला रोखताना त्याच्या बसची चावीही काढून घेतली. पण शाळा प्रशासनानं ग्रामस्थांना चावी पुन्हा धर्मेंदरला देण्यास सांगितली तसेच पुढच्यावेळी नवा ड्रायव्हर पाठवू असं सांगितलं.

यानंतर बस काही अंतरावरच गेल्यानंतर ड्रायव्हरनं बसवरील नियंत्रण गमावलं आणि ही बस वेगानं बाजुच्या झाडावर जाऊन आदळली. या बसमधून ४० जीएल पब्लिक स्कूलचे ४० विद्यार्थी प्रवास करत होते. धडकेनंतर ही बस उलटली, त्यामुळं बसचा पार चक्काचूर झाला आणि त्यामुळं या बसमध्ये असलेल्या ६ चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले.

दरम्यान, केवळ ग्रामस्थचं नव्हे तर काही पालकांनी देखील या ड्रायव्हरच्या दारु पिण्याच्या सवयीबद्दल शाळा प्रशासनाकडं तक्रार केली होती. पण तरीही शाळेनं ही बाब गांभीर्यानं न घेता त्याकडून साफ दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

तिघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ड्रायव्हर धर्मेंदरसह शाळेच्या मुख्याध्यापिका दिप्ती आणि एक अधिकारी होशियार सिंह यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की, अपघातस्थळावरुन धर्मेंदर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या वैद्यकीय तपासणीत तो दारुच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Latest Marathi News)

ईदच्या सुट्टीदिनीही शाळा कशी सुरु ठेवली?

दरम्यान, गुरुवारी देशभरात रमजान ईद निमित्त शाळांना सुट्टी होती. तरीही जीएल पब्लिक स्कूलनं शाळा सुरु ठेवल्यानं या शाळेवर संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी महेंद्रगडच्या उपायुक्त मोनिका गुप्ता यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडं प्रस्ताव पाठवला की, ईदची सुट्टी असतानाही ही शाळा सुरु ठेवल्यानं राज्य सरकारनं या शाळेची मान्यता रद्द करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT