Rahul Gandhi esakal
देश

Rahul Gandhi : ''लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केलं जाईल'', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बुधवारी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक केली जाईल.

संतोष कानडे

Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बुधवारी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक केली जाईल.

rahul gandhi in assam

आसामच्या सिबसागर जिल्ह्यातील नाझिरा येथे बुधवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केलेली आहे. एक विशेष तपास पथक तपासणी करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केली जाईल.

भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसा भडकावल्याचा आरोप राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेला आहे. पोलिसांनी स्वतः दखल घेत २३ जानेवारी रोजी एफआयआर दाखल केलेला आहे.

आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंह यांनी सांगितलं की, अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (सीआयडी) हे प्रकरण एसआयटीकडून सीआयडीके वर्ग केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Agrawal: कोण आहेत राजेश अग्रवाल? राज्याचे मुख्य सचिव म्हणून घेणार पदभार

Maharashtra Politics: जो ठाकरेंसोबत गेला, तो भुईसपाट झाला; मंत्री आशीष शेलार यांचा टोला

बापरे! अभिनेता शशांक केतकर बेपत्ता, सिद्धार्थ जाधव घेऊन फिरतोय मिसिंगचे पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या तरुणाने दिला जीव

'Virat Kohli - Rohit Sharma मुळे अनेक रात्री झोपलो नव्हतो, त्यामुळे...', २०२७ वर्ल्ड कप खेळण्यावर भारताचा प्रशिक्षक स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT