Rahul Gandhi
Rahul Gandhi esakal
देश

Rahul Gandhi : ''लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केलं जाईल'', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान

संतोष कानडे

Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बुधवारी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक केली जाईल.

rahul gandhi in assam

आसामच्या सिबसागर जिल्ह्यातील नाझिरा येथे बुधवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केलेली आहे. एक विशेष तपास पथक तपासणी करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केली जाईल.

भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसा भडकावल्याचा आरोप राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेला आहे. पोलिसांनी स्वतः दखल घेत २३ जानेवारी रोजी एफआयआर दाखल केलेला आहे.

आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंह यांनी सांगितलं की, अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (सीआयडी) हे प्रकरण एसआयटीकडून सीआयडीके वर्ग केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT