Gujarat Assembly Elections Amit Shah  Sakal
देश

Amit Shah: दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये'; गृहमंत्र्यांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - टेरर फंडिंग दहशतवादापेक्षाही मोठा धोका आहे, असे सांगत याचा संबंध कोणत्याही धर्माशी, राष्ट्रीयत्वाशी किंवा गटाशी जोडला जाऊ नये, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

राजधानीतील हॉटेल ताज पॅलेस येथे दहशतवादविरोधी वित्तपुरवठ्यावरील 'नो मनी फॉर टेरर' या विषयावरील तिसऱ्या मंत्रीस्तरीय परिषदेला संबोधित करताना शहा म्हणाले की, दहशतवाद्यांना संरक्षण देणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणे. ही सर्व देशांची सामूहिक जबाबदारी आहे की अतिरेकी घटक आणि अतिरेकाला पाठबळ देणाऱ्या देशांना रोखणे.

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

शहा म्हणाले की, दहशतवादी सतत हिंसा करण्यासाठी, तरुणांना कट्टरतावादी बनवण्यासाठी आणि आर्थिक संसाधने वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच सायबर गुन्हेगारीच्या साधनांचा वापर करून आणि आपली ओळख लपवून कट्टरतावाद पसरविण्याचं काम करतात.

दरम्यान दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहे. परंतु माझा असा विश्वास आहे की दहशतवादाला वित्तपुरवठा करणे दहशतवादापेक्षा अधिक धोकादायक आहे कारण अशा प्रकारच्या वित्तपुरवठ्यामुळे दहशतवादाला पाठबळ मिळतं. शिवाय दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याने जगातील देशांची अर्थव्यवस्था कमकुवत होते,' असेही अमित शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT